Monday, August 9, 2010

? शाप ?


माझ्या कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली .मन विषण्ण होणे म्हणजे काय याचा नेमका अनुभव आला , त्यातच १०-१२ वी तील अगदी कोवळ्या मुलामुलींच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. इतका मोठा आयुष्य संपविण्याचा निर्णय केवळ एखाद्‍यादुसर्‍या अपयशामूळे घेताना त्या मूलाला/मूलीला काहीच वाटलं नसेल ,संकटांना घाबरून पाठ फिरवायची नसते, त्याला सामोरे जायचे असते हे त्यांना कोणी कधी सांगितले नसेल , आई-वडीलां चा जराही विचार त्यांनी केला नसेल , की त्यांच्याच भीतीमूळे....................................................................?


प्रश्‍न न संपणारे ?????????????????????????

यामूळे साध्य काय झाले , काय उरले ,.............................................?????????

जे आतून आले ते वहीत उतरलं ........................................



? शाप ?

तो आत्महत्येचा अवघड

निर्णय घेऊन निघून गेला

मागे उरले फक्‍त

आभाळ फाटलेली माय

कोसळलेला बाप

आक्रंदणारी बहीण

आणि अनिश्‍चिततेचा शाप !

- समीर पु. नाईक

No comments:

Post a Comment